Posts

Showing posts from February, 2021

कालजयी दिनकर

Image
             सदियों की ठंडी बुझी राख सुगबुगा उठी,               मिट्टी सोने का ताज पहन इठलाती है,              दो राह, समय के रथ का घर्घर नाद सुनो,              सिंहासन खाली करो की जनता आती है| सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींच्या दडपशाही आणि संपुर्ण देशावर १९७५ सालानंतर तब्बल २१ महिने लादलेल्या आणिबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांचे एक देशव्यापी आंदोलन चालू होते. त्या आंदोलनाच्या यज्ञकुंडातून बाहेर पडणारी अग्निशिखा जनमानसात धगधगती ठेवण्याचे काम ज्या कवितेने केले होते ती कविता म्हणजे 'सिंहासन खालि करो की जनता आती है'.आणि या क्रांतिकारी कवितेचे उद्गाते आहे राष्ट्रकवी 'रामधारी सिंग दिनकर' उर्फ 'दिनकर'.       दिनकर हे आजही हिंदी साहित्यातील एक दिग्गज कवी म्हणून ओळखले जातात. ज्यांची ख्याती 'संसद से लेकर सडक तक, और जिल से लेकर जन-जन तक' अशी होती. दिनकरांचा जन्म २३ सप्टेंबर १९०८ सिमरिया (मुंगेर) जे आता बिहार मधिल बेगुसराय जिल्हात येते तिथे ...

एक बेगम अशीही...

Image
  भारतीय उपखंडाचे रॅडक्लिफ रेषेमुळे जसे स्पष्ट दोन भाग केले गेले, तितक्या स्पष्टपणे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान व त्यांची पत्नी बेगम राणा या दोहोंचा विलगपणे विचार करणे अवघड आहे. बेगम राणांसारख्या निर्भय, महत्त्वाकांक्षी महिलेचे चित्रण करणे हेही तितकेच आव्हानात्मक. एका नव्याने जन्माला घातलेल्या राष्ट्राचे बाळंतपण करण्यासाठी बेगम राणा यांनी पदर खोचला होता. म्हणूनच त्या ‘मदर ऑफ पाकिस्तान’ म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठी त्यांनी आपले दिल्लीतील घर- ज्याची नुसती बागच जवळजवळ तीन एकर एवढी होती- ते सोडले. ज्या घरात त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना (अशरफ आणि अकबर) यांना जन्म दिला होता, ते सोडून एका नव्याने जन्माला आलेल्या देशात कायमचे राहायला गेल्या होत्या. मुळात हा नवीन देश राष्ट्र म्हणून टिकेल की नाही याचीही खात्री नव्हती. हे दिल्लीतले घर फक्त एवढय़ासाठीच महत्त्वाचे आहे का? तर तसे अजिबात नाही. भारतीय मुस्लीम लीग ही याच घरात- ‘८, होल्डिंग रोड’ - वाढली, पोसली गेली. लीगच्या बैठकांवर बैठका या घरात झाल्या, ते मुस्लीम लीगच्या चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. हे सर्व विस्ताराने चित्रि...