Posts

Showing posts from September, 2021

लिखाणाचं मुलद्रव्य सांगणारा संवाद...

Image
  भारतात 1980 नंतर समाजात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक स्थित्यंतरे दिसू लागली. या काळात धनशक्तीने विवेकापासून फारकत घ्यायला सुरुवात केली. समाजाला मूल्यांची चाडही वाटेनाशी झाली. केवळ वित्ताचे आकर्षण वाटू लागले. यातून मग मोठ्या प्रमाणात व्यक्तिवाद बोकाळायला सुरुवात झाली. पण या सगळ्यांचं योग्य असं अर्थघटन करून ते इतरांना समजावून सांगणार कोण? उत्तम साहित्याची जबाबदारी जी सुरू होते ती इथूनच! साहित्य म्हणताच त्यात नाटक, कथा, कादंबरी निबंध हे सर्वच रस येतात. या सर्व माध्यमांतून समाज म्हणून आपण नक्की कुठून कुठे चाललो आहोत किंवा कुठून कुठे पोहोचलो आहोत? हा आरसा आपल्याला सकस साहित्य दाखवत असतं. आपल्या आजूबाजूला बदलणाऱ्या गोष्टींना टिपणारं कसदार असं साहित्य हे वाचकांना विचार करायला प्रवृत्त करत असतं. या साहित्याच्या वाचनातून वाचकाची संवेदनशीलता वाढत असते. प्रश्नांना कोणत्या पद्धतीने भिडायचं याचं दिग्दर्शन आपल्याला या साहित्यातून होत असतं. हे अंगी बाणवण्यासाठी काय करावं लागतं, हा बदल समजून घ्यायला आपण कमी पडत असू तर काय करावं? याचं उत्तर आहे त्यातलं ज्यांना कळतं, ज्यांना यातला दांडगा...

तुका झालासी कळस!

Image
तुकोबांच्या वैकुंठगमनाला साडेतीनशे वर्ष झाल्या निमित्ताने दिलिप पुरूषोत्तम चित्रे यांनी लिहिलेलं आणि शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित छोटेखानी पुस्तक म्हणजे 'तुकोबाचे वैकुंठगमन' हे होय.  एकाच वेळी संतत्व आणि कवित्व यांचा सुरेख संगम आपल्याला महाराष्ट्रातील कित्येक संत चरित्रात पहायला मिळतो. माऊली ज्ञानेश्वरांपासून ही परंपरा सुरू होऊन तुकोबारायांनी त्यावर कळस चढवला. सर्वसामान्य माणसाचे जीवन हे स्वार्थाच्या कसोटीवर चालणारे असते. संतांना वैयक्तिक स्वार्थ नसतो. माणसे स्वार्थी असतात हे संतांना ठाऊक असते. माणसे लुच्ची, लफंगी, इच्छा, वासना, विकार, महत्वाकांक्षा, अहंकार यत गुरफटलेली असतात याची संतांना जाणीव असते. तरी माणसांच्या सर्व चुका, त्यांचे सर्व अपराध, त्यांची सर्व वैगुण्ये सहन करण्याची शक्ती संतांमध्ये असते. आईवडीलांपेक्षाही संतांची माणसांवरची माया जास्त वत्सल असते असे तुकोबांनी सांगितलेले आहे.आपल्या सभोवारच्या माणसांच्या जीवनव्यवहाराची कठोर चिकित्सा तुकोबांनी आपल्या काव्यात केली आहे. १९ व्या शतकातील आपल्या मराठी समिक्षकांना एक वेडाने पछाडलेले आहे ते म्हणजे 'सामाजिक जाणीव'....

ए भाऊ! 'शिक्षक' नको होऊ...

Image
  सकाळी सकाळीच रविच्या व्हाट्सप वर विनयचा एक मेसेज आला 'शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!' म्हणून. तो मेसेज वाचून रविच्या समोर मागील सहा सात वर्षाचा काळ असा झरझर सरकत गेला. तेव्हढ्यात रविला विनयचा फोनच आला. हाय हॅलो झाल्यावर काय चाललंय सध्या वगैरे विनय ने विचारपूस केली. गेली दोन तीन वर्ष या दोघा मित्रांचा एकमेकांशी तसा संपर्कच राहीला नव्हता. विनय एका आयटी कंपनीच्या प्रोजेक्ट साठी बंगलोरला गेला होता. तेव्हढ्यात रविला आलेला हुंदका त्याला आवरता येईना.  विनय:- रव्या अरे काय झालंय?  रवि:- काही नाही रे असंच जरा भरून आलं होतं.  विनय:- हो, पण कशामुळे? नेमकं काय झालंय ते सांगशील तर खरं. मला कसं कळणार? रवि :- विन्या! अरे माझं ग्रँटेबल ला काम झालंय. (हे सांगताना  रविच्या डोळ्यात पाणी आलं) "विन्या! अरे शिक्षकांच्या ग्रँटेबल- नाॅन ग्रँटेबल नावाची काही पदं असतात हे माहीत तरी आहे का तुला? गेल्या चार वर्षात आपला मित्र काय करतोय, काय भोगतोय याची काडीचीही कल्पना आहे का तुला ?" गहिवरून आल्याचा आवाजात रवि बोलत होता.   दोघेही लहानपणापासून मित्र एका शाळेत शिकले. पुढे अकरावी...