Posts

Showing posts from October, 2022

कॅप्टन फॅन्टॅस्टिक

Image
मी नुकताच कॅप्टन फॅन्टॅस्टिक हा सिनेमा पाहिला. ॲमेझाॅन प्राईमवर तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या सिनेमाची मध्यवर्ती गोष्ट अशी की यातला मुख्य नायक बेन (व्हिगो माॅर्टेसन) हा विधुर आहे. त्याची प्रिय पत्नी ही एका मनोविकाराशी झुंज देत असताना या जगाचा लवकरच निरोप घेते. बेन हा म्हटला तर जरा जास्तच आडमूठा आहे. त्याच्यावर थोरो या अमेरिकन विचारवंताचा प्रभाव दिसतो. म्हणजे बेन असा विचार करतो की माणसांना शाळा, काॅलेजांची गरजच काय? जे काही शिकायचं असेल ते आपण निसर्गाकडूनच शिकावं. स्वतःला चार भिंतीत कोंडून शिकण्यापेक्षा हिंडावं फिरावं त्यातून जे शिकता येईल ते शिकवं यावर तो ठाम असतो. आपल्या पत्नीवर वैद्यकीय इलाज काम करत नाहीये; तेव्हा बेन एक मोठा निर्णय घेतो की, आपण दोघांनी मुलांसह जंगलात जाऊन रहावं. तेही कायमचं. तस ते दोघे करतात पण. त्याची सहा मुलं घेऊन ते जंगलात राहतात पण. बेन एका मोठ्या बस मध्ये सर्व सोयी करवून घेतो आणि जातो मुलाबाळांसह जंगलात रहायला. सोबत चिक्कार पुस्तक घेऊन जातो ज्यात जेरेड डायमंड च्या गन्स,जर्म्स ॲन्ड स्टिल पासून ते नाॅम चोम्स्कीच्या सर्व पुस्तकांपर्यंत अशी सगळ्यांची पुस्तके असतात....

वह कौन रोता है वहाँ!

Image
  गेली दोन-तीन महिने महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ म्हणू नका असा कोणताच भाग नाहीये की ज्याला या अतिवृष्टीचा तडाखा बसला नाहीये. यात सर्वात कहर झाला तो गेल्या दोन आठवड्यात. परतीच्या पावसामुळे तब्बल ३६ लाख हेक्‍टरवरील पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत.  दिवाळीला केवळ दोन दिवस राहिलेले असताना निसर्ग हा असा सर्वत्र कोपला आहे/होता.  खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास या अतिपावसाने शेतकऱ्यांकडून असा हिरावून घेतला. ऑक्टोबर मधील केवळ दोन आठवड्यांत तब्बल १६ जिल्ह्यांना या पावसाने तडाखा दिला. यात तब्बल सव्वा लाख हेक्‍टरवरील सोयाबीनचे पीक नष्ट झाले. शहरांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांचे जसे हाल झाले त्याहूनही वाईट परिस्थिती आज खेडोपाडी आहे. पण आज खेड्यापाड्यातही मोठ्याप्रमाणात पाणी तुंबून राहणे ही समस्या का भेडसावते आहे? या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन जरा विचार करावा लागेल. या समस्येला काही एक असं उत्तर नाहीये. अनेक कोणातून या प्रश्नाकडे आपल्याला पाहता येईल. अतिवृष्टी याला जागतिक तापमान वाढ होणं हे एक कारण आहेच पण, त्याच...

मनुष्य गौरव दिन!

Image
  सृष्टीतील श्रेष्ठ निर्मिती ही मनुष्य आहे. पण मनुष्य सृष्टीचालकासोबत असलेला आपला संबंध विसरून स्वतःचीच पीछेहाट करवून घेतो. अशावेळी तो स्वतःला बलहीन समजायला लागतो. भावनिक आद्रतेचे बाष्पीभवन झाल्यासारखं, जीवनात गरीमा गमावून बसल्यासारखं स्थिती तो अनुभवतो. अशावेळी निस्वार्थ प्रेमाची ऊब व उत्साह त्याला मिळाला तर, जीवनाला काही अर्थ प्राप्त होतो. असे केल्याने त्या व्यक्तीमधील आत्मगौरव, अस्मिता, तेजस्विता अशा विविध गुणांना पंख फुटतात. असाच प्रभूस्पर्श 'हट टू हट आणि हार्ट टू हार्ट' घेऊन गेले स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले. ज्यांना संपूर्ण स्वाध्याय परिवार प्रेमाने 'दादाजी' म्हणतो. त्यांचा जन्मदिन (19 ऑक्टोंबर) स्वाध्याय परिवार हा  'मनुष्य गौरव दिन' म्हणून साजरा करतो. भारतातील कृतिशील तत्वज्ञांमध्ये ज्यांचा क्रमांक फार वरचा लागतो. स्वाभिमान गमावलेल्या, हीन-दीन तसेच केवळ लाचारी करण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता समजणार्‍या लोकांना स्वाभिमानाचं महत्व कधी समजेल का ? त्यांना स्वतःबद्दल कधी गौरव वाटेल का ? ही दादांची व्यथा होती. स्वाभिमानानं परिपूर्ण अ...

स्मार्ट फोनचं स्मार्ट जाळं

Image
पत्र आणि लॅन्डलाईनच्या काळात एखाद्याशी संपर्क साधणे हे खूप वेळखाऊ प्रकरण होते. अविश्वसनीय होतं. कारण पत्र ज्याला पाठवलं आहे त्याच्याच हातात ते पडेल ना? ज्याच्यासाठी लॅन्डलाईनवर फोन केला आहे तोच फोन उचलेल की नाही याची खात्री नव्हती. थोडक्यात पत्र आणि लॅन्डलाईन मध्ये आपला खाजगीपणा (प्राईव्हसी) जपला जाईलच असं नाही. मोबाईल मुळे खाजगीपणा जपणे ही गोष्ट जास्त शक्य झाली त्यामुळेच त्याला प्रचंड लोकाश्रय मिळाला. त्याच बरोबर सहज संपर्क करता येणं, त्यात असलेल्या सुविधांचाही त्याला मिळणाऱ्या लोकाश्रयात मोठा वाटा आहेच. पण या स्मार्ट फोनने आज आपल्याला विळखा घातला आहे असं नाही का वाटत? व्हाट्सप आणि मेसेंजरच्या युगात तर ते अगदी स्वस्त आणि झटपट झाले आहे. स्मार्टफोनच्या या सहज उपलब्ध सोईंमुळे सोशल मिडियावर आपण लिहिलेल्या मजकुरावर आपण परत परत जातो. शक्य असेल तर उत्तर देतो. वेळोवेळी सोशल मिडिया स्टेटस अपडेट करत बसतो. त्यावर आलेले लाईक्स, लव्ह, शेअर्स वगैरे गोष्टी मोजत बसतो. पण यासगळ्या गोष्टीत अडकून पडणे गरजेचे आहे का? आपल्याला यावरचं बंधन नको वाटणे हे आपण निवडू शकतो. आपण या सर्व गोष्टींना थोडी वाट पहायला...