Posts

Showing posts from November, 2022

शासन, साहित्यिक आणि बांधिलकी

Image
 आणीबाणीतल्या अनुभवाने दुर्गाबाईंना आतून बाहेरून हालवून टाकले होते. शासन म्हणजे लेखकांचे आश्रयदाते आणि लेखक म्हणजे जणू त्यांचे आश्रित. आणिबाणी नंतर दुर्गाबाई स्वतःशीच विचार करु लागल्या की लेखक नि शासक यांच्यामधला संबंध नेमका कसा असावा? काही लेखकांच्या मते तो सौहार्दाचा असावा. पण असा विचार करणे हे पूर्णपणे एकतर्फी आहे. कारण शासनाचा पक्ष हा केव्हाही इतका सामर्थ्यशाली असतो की तो तुमच्या (म्हणजेच साहित्यिकांच्या) सहकार्यास फारसा उत्सुक नसतो. राज्यकर्त्ये स्वतः मोठेपणा मिरवण्यासाठी, "लेखकांना अनुदाने देणे हे सरकार म्हणून  आमचे कर्तव्यच आहे!" अशी भाषणेही करत असतात. पण यात छुपा अर्थ असा असतो की, "आम्ही तुम्हाला दान देत आहोत". आणि बहुसंख्य लेखकांना ही अनुदाने दान वा उपकार न वाटता ती त्यांची हक्काची देणगी वाटते. लेखकांचा दावा हा असतो की शासनाच्या या अनुदानामध्ये दान किंवा उपकार काहीही नसते तर तो जनतेचा पैसा परत जनतेलाच दिला जात असतो. मग प्रश्न असा पडतो जर जनतेचा पैसा जनतेलाच परत द्यायचा असेल तर तो एका विशिष्ट वर्गालाच(लेखक, गायक, खेळाडू इ) का दिला जातो? सुतार, लोहार, चांभार ...

मन्नू भंडारी

Image
विसाव्या शतकातील हिंदी साहित्याचा अभ्यास करायचा ठरल्यास ज्या लेखिकेचे साहित्य वाचल्याशिवाय, आपल्याला पुढे जाताच येणार नाही अशी प्रतिभावंत लेखिका म्हणजे मन्नू भंडारी! नुकतेच त्यांच १५/११/२०२१ रोजी देहावसान झाले. मन्नूजींनी आपल्या साहित्यातून केवळ स्त्रियांवर होणारा अन्याय चित्रित केला नाही तर, त्यांच्या कादंबऱ्यांतून त्यांनी सशक्त, पुरोगामी स्त्रियांचं चित्रण केलं आहे. जसे आपका बंटी मधील शकुन ही घटस्फोटीत स्त्री. आपका बंटी ही कादंबरी वाचताना वाचक बंटी या आठ नऊ वर्षाच्या मुलाची, आई बापाच्या घटस्फोटामुळे जी मानसिक ओढाताण होते त्यात गुंतून जातो. अर्थात ते महत्त्वाचे आहेच पण आई वडीलांचा घटस्फोट जरी झाला असला तरी शकुन एक स्त्री आहे. स्त्री म्हणण्यापेक्षाही ती एक माणूस आहे. तिलाही पुढे जावंसं वाटतं. पण त्याच बरोबर बंटीसाठी तीचं आई म्हणून आतडंही तुटतं. तिलाही स्वतःचं एक आयुष्य आहे. पण समाज त्याकडे कधी लक्ष देणार नाही. त्या लहान मुलाचं काय होईल? त्याचं भवितव्याचं काय? याचाच विचार समाज करत असेल. पण त्याच्या आईचं काय? शकुन जेव्हा दुसरं लग्न करते तेव्हा असंही वाटू शकतं की ही स्वार्थी आहे की काय? प...

बदलत्या साहित्याचा नकाशा

Image
 स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी स्वीकारलेल्या समाजवादी धोरणांमुळे भारतात औद्योगिक क्रांती होण्यास तसा उशीरच झाला. आता नेहरूंनी समाजवादी धोरण स्वीकारल्यामुळे भारतात डाव्या विचारसरणीने चांगलेच हातपाय पसरले. याचा परिणाम असा झाला की जे साहित्य गरिबी, कामगार, उपेक्षितांचे प्रश्न मांडतील ते सर्वच नैतीक आणि जे आधुनिक, श्रीमंत, औद्योगिकरणाच्या बाजूने बोलणारे असेल ते सर्वच अनैतिक अशी नाही म्हटली तरी साहित्याची सरळ सरळ विभागणी झाली. पुढे १९९१ साली भारताने आर्थिक उदारीकरण स्वीकारले आणि मध्यमवर्गीय लोकांकडे पैसा खेळू लागला. या आर्थिक सुबत्तेतून मध्यमवर्ग हा उपभोक्तावादाचा सर्वात मोठा बळी ठरला. या झपाट्याने बदलत्या काळात या वर्गाच्या साहित्यिक जाणिवा देखील झपाट्याने बदलत गेल्या. साठोत्तरी समाज ज्यांचा बदल स्वीकारण्याचा वेग मंद होता त्यांनी या उदारीकरणामुळे थेट टाॅप गिअर टाकला. या पंचवीस वर्षातील बदललेलं मराठी साहित्य, साहित्यिक जाणिवा, साहित्या समोरची महत्त्वाची आव्हाने, बदलत्या काळातील साहित्यासमोरची प्रलोभने, प्रादेशिकता, देशीयता, आधुनिकता उत्तर आधुनिकता, इलेक्ट्रॉनिक मीडियाची मानवी मनावर असलेली स...