Posts

Showing posts from 2020

साहित्य संगीत सिनेमा - २०२०

Image
२०२० या सालाने आनंद दिला असं जर कुणी म्हणालं तर,  त्यावर  कुणाचाच  विश्वास बसणार नाही! सक्तीच्या टाळेबंदीमुळे माझं मात्र कचकावून वाचन, सिनेमे, वेबसिरिज पहाने जेव्हढं या वर्षी झालं आहे ते पुन्हा होणे नाही! या वर्षाची सुरूवात दमदार झाली होती. वीणाताईंच्या घरी मुक्कामी असताना झडलेल्या वाद विवादांनी चांगलीच तरतरी आली होती. पण नंतर पुढच्याच महिन्यात टाळेबंदी सुरू झाली आणि आर्थिक बाबतीत माझं चांगलच कंबरडं मोडलं. शेती आहे म्हणून तगलो अन्यथा ... हा 'अन्यथा' फार अस्वस्थ करतो मला आजही. करोना झालेल्या कित्येक मित्रांचे नातेवाईक गेले, माझेही काही नातेवाईक गेले. या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवर एकच कोणती आनंदाची गोष्ट घडली असेल तर ती आहे वाचन, सिनेमे आणि वेबसिरिज पाहणे हे होय!  वाचनाच्या, पाहण्याच्या, लिखाणाच्या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. त्याच आनंदाचा हा धावता धांडोळा. टाळेबंदीत असेल किंवा ती शिथिल झाली त्यावेळी मला कित्येक लोकांनी, मित्रांनी पुस्तके पाठवली त्याबद्दल त्यांच्या ऋणातच मला रहायला आवडेल. यावर्षीचा शेवट तर फार गोड झालाय सातआठ महिन्यापासून अमेरिकेच्या इतिहासा...

सजीव निर्जीवांमधील अद्वैत शोधणारा शास्त्रज्ञ - जगदीशचंद्र बसू

Image
    पॅरिस मध्ये भौतिकशास्त्र तज्ज्ञांची एक परिषद भरलेली होती त्यात एक भारतीय शास्त्रज्ञ व्याख्यान देण्यासाठी उभा होता. समोर एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ (फिजिअाॅलाॅजीस्ट) बसलेले होते. ते या भारतीय शास्त्रज्ञाचे व्याख्यान ऐकून अस्वस्थ होत होते. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण तसेच होते. त्या भारतीय शास्त्रज्ञाची मतं जर मान्य केली तर त्यांना स्वतःला त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाला केराची टोपली दाखवावी लागणार होती! पण त्यांना त्या व्याख्यानात आपल्या चुका कदाचित उमगल्या असाव्यात. व्याख्यान संपले आणि ते भारतीय शास्त्रज्ञाला म्हणाले की," सुरवातीला मला तुमचे सर्वच मतं चुकीचे वाटत होते. पण भाषण पूर्ण ऐकल्यावर माझं मत बदललं". तर ते  भारतीय शास्त्रज्ञ होते जगदीशचंद्र बसू व ते दिग्गज शरिरशास्त्रज्ञ होते डाॅ.वाॅलर.    जगदीशचंद्र बसूंचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी  मैमनसिंग जवळ राणिखल (अत्ताच्या ढाक्या जवळ) झाला. वडील भगवान चंद्र हे ब्रिटिशांच्या सेवेत डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. वडील गेल्यानंतर जगदीशचंद्र बसूंचे आर्थिकदृष्ट्या खूप हाल झाले. वडिलांनी घेतलेले सर्व कर्ज एक एक क...

हायपेशिया!

Image
 लोकसत्ता दिवाळी अंक(२०२०) मध्ये अंजली चिपलकट्टींचा हायपेशियावरचा एक लेख वाचला. लेख छानच आहे तो. त्यानंतर लगेचच आलेहांड्रे मिनाबार दिग्दर्शित आणि राचेल वाईझ अभिनित २००९ सालचा Agora (अगोराचा अर्थ होतो लोकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची जागा) हा सिनेमा पाहीला. चौथ्या शतकातील गणिततज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ज्ञ 'हायपेशिया' जिला रोमन-इजिप्शियन ख्रिस्ती लोकांनी आलेक्झांड्रियात मारून टाकले होते. तिच्या जीवनावर आधारीत आधारित हा सिनेमा आहे. हायपेशियाबद्दल मी अच्युत गोडबोले यांच्या गणिती या पुस्तकात थोडं वाचलं होतं. पण त्या पुस्तकातील तपशील फार विस्तृत स्वरूपात नव्हते. चिपलकट्टींनी मात्र त्यांच्या लेखात हायपेशियावर विस्तृत लिहिलंय.       ग्रीक संस्कृतीचे मानवी जीवनावर असंख्य उपकार आहेत. ख्रिस्तपूर्व चारशे ते इ.स.चारशे या आठशे वर्षांच्या छोट्या कालखंडात या संस्कृतीत काय काय विद्वान लोक जन्माला येऊन गेले आहेत!  प्लेटो, साॅक्रेटीस, ॲरिस्टाॅटल, डेमाॅक्रिटस, अपोलोनिअस, युडोक्झस, युक्लिड, पायथागोरस, टाॅलेमी, अर्किमिडीज, अकॅडमस( अकॅडमी हा शब्द ज्याच्या नावावरून आला तो हाच!), आर्कि...

'इन्शाअल्लाह'- मुस्लिमांच्या ताज्या समस्यांवर योग्य भाष्य करु पाहणारी कादंबरी

Image
    हल्ली हिंदू - मुस्लिम हा धार्मिक संघर्ष फार प्रतिक्रियावादी होत चालला आहे. विशेषकरुन सोशल मिडियावर याचं फारच बटबटीत स्वरूप पहायला मिळतं. आरे ला कारे करणे हे नेहमीचंच झालयं आता. पण प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करण्याची किती लोकांची तयारी असते? सर्जनात्मक (constructive), सकारात्मक (positive) काम करण्यासाठी समाजात स्वतःला किती लोक गाडून घेतात? हे प्रश्न जेव्हा अनुत्तरितच राहतात तेव्हा अशा वेळी कोण मार्ग दाखवणार? राजकारणाने कायमस्वरूपी चिघळवत ठेवलेल्या या प्रश्नाकडे डोळसपणे कोण पाहणार ? महाकवी रामधारी सिंह दिनकर यांच्याच शब्द सांगायचे तर दिनकर म्हणतात, "जब जब राजनीति लडखडाई है तब तब साहित्यनेही उसे संभाला है! " दर्जेदार साहित्य हेच अशा प्रश्नांना थेट भिडण्याची क्षमता ठेवते. सध्याच्या काळात मुस्लिम समाजाच्या समोर असलेले काही प्रश्न की ज्यांना अग्रक्रमाने सोडवलं पाहिजे ते म्हणजे ट्रिपल तलाक, मुस्लिम मुलांची शिक्षणं, बुरखा पद्धत, घटस्फोटानंतरची पोटगी आणि साहित्य निर्मितीत पिछाडीवर असलेल्या मुस्लिमांचा टक्का या आणि अशा ज्वलंत विषयांना थेट हात घालणारी कादंबरी म्हणजे राजहंस ...

ब्रायन ॲडम्स

Image
 अंधाराला भेदत आणि कमरेजवळ एक इलेक्ट्रिक गिटार लटकवत स्टेजवर उभ्या केलेल्या एका स्टँड माईकजवळ तो येतो. अंगात एक साधासा टी शर्ट, चापून चोपून बसवलेला केसांचा भांग आणि नुकतीच दाढी केलेला असा एक गोरापान व्यक्ती त्या माईकचा ताबा घेतो. गिटारच्या तारा छेडत तो फक्त त्याच्या एका गाण्याचा मुखड्याची सुरुवात करत म्हणतो I got my ...! आणि स्टेडिअम जे सळसळत्या तरुणाईने खचाखच भरलयं त्यांच्यात या तीन शब्दाने जणू वीजच संचारते. पब्लिक  first real string म्हणत पुढचं सर्व कडवं पुर्ण करतं. हा त्याला फक्त गिटारने साथ देत असतो. ते गाणं म्हणजे ब्रायन ॲडम्सच्या Reckless या अल्बम मधलं  Summer of 69 होय. ब्रायन ॲडम्सचा आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस. ब्रायन आज वयाच्या एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. सन १९८४ ला रिलीज झालेल्या Reckless अल्बममधल्या summer of 69 या गाण्यावर तरुणाई आजही थिरकते. चार महिण्यात एखादं गाणं विस्मृतीत जाण्याच्या आजच्या या काळात छत्तीस वर्षापूर्वीच्या एका गाण्याच्या जोरावर  लोकांना खिळवून ठेवणं हे इतकं सोपे नाहीये. ते गाणंही तसंच असावं लागतं!  ब्रायनचा summer of 69...

लेखकाची गोष्ट

Image
    भारतीय तत्वज्ञान हे मुख्यतः तीन प्रश्नाचा शोध घेत असते. मी कोण?, मी कोणाचा? आणि मी कोणासाठी?. यातल्या मी कोण या प्रश्नाचे उत्तर हे व्यक्तीसापेक्ष आहे. याच 'मी कोण?' या प्रश्नाचे माझं स्वतःचे उत्तर काय तर, 'मी एक लेखक आहे.'  हे शोधण्याचा लेखक म्हणून केलेला प्रयत्न म्हणजेच विश्राम गुप्तेंच लेखन आत्मचरित्र 'लेखकाची गोष्ट' हे होय.    आत्मचरित्रात त्या व्यक्तिच्या समकालीन आर्थीक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे चित्रणही यायला हवे. केवळ चरित्रनायकाच्या जीवनात येणाऱ्या व्यक्तीबद्दलचंच लिखान नको. गुप्तें आपल्या या गोष्टीत या सामाजिक, राजकीय, साहित्यिक पर्यावरणाचा वेधही घेतात व त्यांना आपल्या परीने डिकोड करण्याचाही प्रयत्नही करतात. मराठी साहित्याबद्दल बोलताना ते म्हणतात की, मराठी लेखक हे प्रायः कौटुंबिक लिहितात. तसं लिखान करण्यात वाईट असं काहीच नाही परंतु ते लिखान हे अपूर्ण आहे असं समजावं. साहित्य विश्वात जे जे ग्रेट साहित्य लिहिलं गेलं आहे ते ते माणसाला सतत भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालत असते. सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात साहित्य वर्तुळात तसेच राजकीय वर्तुळातही दोन गट ...

भावनिक बुद्धिमत्ता !

Image
    एक प्रसिद्ध जादूगार एकदा एका प्रेक्षागृहात जादूचे प्रयोग करत होता. दोनचार हजार माणसे बसतील एवढे मोठे प्रक्षागृह होते ते. जादूचा प्रयोग ऐन रंगात आल्यावर एक अधिकारी मंचावर आले आणि जादूगाराच्या कानात काहीतरी पुटपुटले. त्यावर जादूगाराने होकारार्थी मान हलवत,"आपण हे करुयात" असे अधिकाऱ्याला सांगितले. मग पेक्षकांकडे वळून तो म्हणाला,"आत्ता या अधिकारी साहेबांनी एक विचित्र जादू पहायची इच्छा व्यक्त केली आहे,पण ती जादू मी सभागृहात करू शकत नाही,ती मला बाहेर करावी लागेल,जिथे मी हवेत हळुवार उडू शकतो आणि गायब होऊ शकतो. तेव्हा मी आपल्या सर्वांना बाहेर येण्याची विनंती करतो". ते अधिकारी दुसरे तिसरे कोणी नसून,एक अग्निशमन अधिकारी होते,जे खरेतर भीतीपोटी निरोप द्यायला आले होते की, "प्रेक्षागृहाला आग लागली आहे,आणि थोड्याच वेळात आग सर्वत्र पसरू शकते. तेव्हा सर्वांना लवकरात लवकर हे प्रेक्षागृह रिकामे करायला सांगा." अजिबात भावनिक न होता क्षणात जादूगाराने युक्तीने,वरील कारण देऊन लोकांना प्रेक्षागृहाबाहेर काढले. तो जादूगार होता ब्लॅकस्टोन. प्रसंगावधान दाखवत त्याने स्वतःच्या व प्रे...

मैत्री रिफ्रेश करताना...!

Image
 मैत्री ही स्फुलिंगासारखी असते. ती केव्हा आणि कुणासोबत प्रकट होईल ते सांगता येत नाही. कित्येकदा अनेक वर्षांच्या सहवासातही ती अप्रकटच राहील, तर काही वेळा अत्यल्प सहवास घडलेला असूनही ती प्रकट होऊन दोन व्यक्ती कायमस्वरूपी जोडल्या जाऊ शकतील. मैत्रीची आपल्या आयुष्यात अत्यंत गरज असून आपण त्याचा पुरेसा विचार के लाय का कधी? मुबलक पैसा, चांगली नोकरी नाही म्हणून हळहळणारे आपण आपल्याला पुष्कळ मित्रमैत्रिणी नाहीत म्हणून हळहळतो का कधी? पुरुष-पुरुष, स्त्री-स्त्री आणि स्त्री-पुरुष असे मैत्रीचे प्रकार. त्यातल्या तिसऱ्या प्रकाराकडे- म्हणजेच ‘स्त्री-पुरुष’ मैत्रीकडे म्हणूनच आज डोळसपणे पाहण्याची फार गरज आहे, असं मला वाटतं. आपल्या भारतीय समाजाचा सांस्कृतिक इतिहास बघता आपल्याला स्त्री-पुरुष मैत्रीकडे डोळसपणे पाहता आलेलं नाहीये. रक्ताच्या स्त्री-पुरुष नात्याच्या पलीकडे आजही आपण पाहू शकत नाही. स्त्री-पुरुष संबंधांवर सामाजिक दडपणं तर आहेतच, शिवाय त्याला लैंगिकतेचाही एक पदर आहे.      ‘टिपिकल’ बॉलीवूड चित्रपटांनी स्त्री-पुरुष संबंधांकडे कधीच गंभीरपणे पाहिलेलं दिसत नाही. ‘मैंने प्यार किया’ या च...

उदगीरी बोलीतील शब्दशिल्प...!

Image
   इंग्रजीत एक म्हण आहे 'मोअर यु पर्सनल,मोअर यु युनिव्हर्सल' लेखक जितकं जास्त आपल्या मातीतलं लिहिल तितका तो अधिक वैश्विक होत जातो. आज मराठी साहित्यात असे अस्सल स्थानिक बोलिभाषेत लिहिणारे लेखक फार कमी आहेत. अगदी एकही नाही असं मी म्हणणार नाही. बोलीभाषेत लिहिलं तर कुणी आपलं लिहिलेलं वाचेल का?  त्याला प्रतिसाद देतील का? हा भयगंड असल्यामुळेही कदाचित बरेचसे लेखक स्थानिक बोलीभाषेत लिखाण करताना दिसत नाही. प्रसाद कुमठेकर हे तरूण लेखक मात्र याला अपवाद आहेत. पेशाने संवाद लेखक असलेले आणि मूळचे उदगीरचे कुमठेकर यांच्या  पार पब्लिकेशन तर्फे प्रकाशित दोन कादंबऱ्या एक म्हणजे 'बगळा' आणि दुसरी 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या'. प्रमाण मराठी भाषेतली पुस्तके जितक्या सहज आणि पटपट वाचत आपण पुढे जातो तितक्या सहजतेने जरी दोन पुस्तके वाचता येत नसली तरी वाचकाला एका जागेवर खिळवून ठेवण्याइतपत सशक्त आशय या दोन पुस्तकात नक्कीच आहे.कादंबऱ्यांच्या आशयाचे आकलन वाचकाला होईल की नाही या भितीला अजिबात थारा न देता, निगूतीने निवेदनासाठी कुमठेकरांनी उदगीरी बोलीभाषाच वापरली व त्या भाषेचा गोडवा हा वाक्या...

'इंडिका' - भारताच्या भूगोलाची कहाणी !

Image
 अभ्यासाची फार मोठी अशी एक परंपरा सर्वत्र पहायला मिळते. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकांपासून भूगोलाच्या अभ्यासाला प्रारंभ झाल्याचे दाखले सापडतात. या भूगोलाच्या अभ्यासाला गती प्राप्त झाली ती कार्टोग्राफी म्हणजे नकाशा तयार करण्याचे तंत्र शोधल्यामुळे. आधुनिक काळात उपग्रहतंत्रज्ञान (सॅटेलाईट टेक्नॉलॉजी), जीपीएस या तंत्रज्ञानाचा शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात वापर मोठा आहे. सध्या भौगोलिक इतिहास हा शालेय अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षा यापुरताच मर्यादित झाला आहे. क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर काही पुस्तके अशी असतात जी भूगोल, मानवी उत्क्रांती, जीवसृष्टीचा नैसर्गिक इतिहास या विषयातसुद्धा रस निर्माण करतात. असंच एक पुस्तक म्हणजे प्रणय लाल लिखित व नंदा खरे अनुवादित 'इंडिका' हे होय. मधुश्री प्रकाशन ने हे प्रकाशित केलं आहे.     इंडिका हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागले गेलेलं आहे. पृथ्वीच्या निर्मिती पासून ते थेट आजच्या प्रगत अशा होमो सेपियन मानवाच्या उत्क्रांती पर्यंत ते येऊन थांबतं. भौगोलिक इतिहासात एक सर्वात महत्वाची पायरी असते ती म्...

चंद्राच्या स्त्रिया !

Image
    आपल्याकडे सर्वसाधारण वाचणाऱ्यांचे वाचनविश्व थोडे मराठी, थोडे हिंदी, थोडे इंग्रजी या त्रिकोणापुरतेच मर्यादित असते. या त्रिकोणाबाहेरील अरब साहित्य- म्हणजेच तिसऱ्या जगातले लेखन हे अगदी तुरळकांच्या वाचनात येते. मुळात आपली अरब साहित्याची झेप ही खलिल जिब्रान, नजिब माहफुज (माहफुज यांना १९८८ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे!) आणि ‘अरेबियन नाइट्स’च्या पलीकडे जात नाही. त्यामुळे अरब साहित्यातील स्त्री-लेखकाच्या साहित्यवाचनाची शक्यता तर अधिकच धूसर. पण डॉ. जोखा अल्हार्थी या ओमान देशातील लेखिकेच्या साहित्याकडे आवर्जून वळायला हवे. ओमानची राजधानी मस्कतमधील सुलतान काबुस विद्यापीठात डॉ. जोखा अल्हार्थी प्राध्यापक आहेत. डॉ. अल्हार्थी यांनी अभिजात अरब साहित्यात एडिन्गबर्ग विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे. त्यांचे आजोबा, वडील व काका असे तिघेही विख्यात ओमानी कवी होते/आहेत. डॉ. अल्हार्थी यांच्या ‘सेलेस्टिअल बॉडीज्’ या इंग्रजीत अनुवादित कादंबरीस २०१९ सालच्या ‘नॉन-फिक्शन’ गटातील ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्या अरब राष्ट्रामधल्या पहिल्या अशा व्यक्ती व पहिल्या ...

आशेची पवनचक्की

Image
  'नेटफ्लिक्स ओरिजीनल' या नेटफ्लिक्स च्या स्वतःची निर्मिती असलेल्या सिनेमांमधील 'द बाॅय हू हार्नेस्ड द विंड' या विल्यम कामकवांबा या आफ्रिकन मुलाच्या  पुस्तकावर आधारित असलेला त्याच नावाचा हा चित्रपट. या चित्रपटाच्या माध्यामातून चिविटाल इजिओफोर (Chiwetel Ejiofor) याने दिग्दर्शनात पाऊल ठेवत एक दमदार सुरूवात केली आहे. विल्यम कामक्वांबा (मॅक्सवेल सिंबा) हा ‘मलावी’ या दक्षिण आफ्रिकी प्रदेशातील विंम्बे या ४०-५० उंबरठे असलेल्या छोट्या वस्तीवजा गावातील एक १४ वर्षाचा मुलगा आहे. शाळेत जाऊन चांगलं शिक्षण घेण्याची विल्यमला प्रचंड ओढ आहे पण, घरात अठराविश्व दारिद्रय असल्याने ते घेणे विल्यमला शक्य नाही. मलावी मधील लोकांना शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सभोवतालची परिस्थितीच तशी आहे. मलावी सोडून इतर कुठे काम मिळेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे शेती हा एकमेव व्यवसाय त्यांच्यासमोर आहे. गावातील शेतकऱ्यांची ठेकेदार, व्यापाऱ्यांकडून फार लुट होत आहे. या सगळ्या सामाजिक पार्श्वभूमीवर ही कथा घडते .     ट्रायवेल कामक्वांबा(इजिओफोर) व अग्नेस (आयासा मायगा / Aïssa Maïga) हे विल्यमचे आईवडिल ...